अतीव्रुष्टी नुकसानभरपाई, हेक्टरी एवढी मदत मिळनार…nuksan bharpai
ऑगस्ट महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरं,दुकानांचेही नुकसान झाले आसून काही ठिकाणी मानसं दगावल्याच्या घटना झाल्या आहेत. यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंचनामे सुरू झाले असून, हे पंचनामे ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी २७ मार्च २०२३ रोजी एक सरकारी आदेश काढण्यात आला होता. या आदेशानुसार, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF) अंतर्गत ही मदत दिली जाईल.
2025 साठी नुकसान भरपाईचे दर काय आहे हेक्टरी किती भरपाई मिळनार याबाबत सविस्तर माहिती पाहूयात…
अतीव्रुष्टी नुकसानभरपाई – किती मदत मिळनार ?
जर कोणाचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला ४ लाख रुपयांची मदत मिळेल.
व्यक्तीला ४०-६०% अपंगत्व आल्यास ७४,००० रुपये आणि ६०% पेक्षा जास्त अपंगत्व असल्यास २.५ लाख रुपये दिले जातील. तसेच, जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असल्यास त्यासाठीही मदत मिळेल.
घरांचे नुकसान झाल्यास, पक्क्या घरासाठी १.२ लाख आणि कच्च्या घरासाठी १.३ लाख रुपयांची मदत दिली जाईल.
कपड्यांसाठी आणि घरगुती वस्तूंसाठी कुटुंबाला प्रत्येकी २५०० रुपयांची मदत मिळेल.
शेतीतील नुकसानीसाठी प्रति हेक्टर ८,५०० ते २२,५०० रुपयांपर्यंत मदत मिळेल, पण ही मदत जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत मर्यादित असेल.
जनावरांच्या नुकसानीसाठी गाय-म्हशींसाठी ३७,५०० रुपये आणि शेळी-मेंढीसाठी ४,००० रुपये प्रति जनावर मदत मिळेल. कुक्कुटपालन व्यवसायासाठी प्रति पक्षी १०० रुपये आणि जास्तीत जास्त १०,००० रुपये मदत मिळेल.
३० मे २०२५ च्या नवीन सरकारी आदेशानुसार, खरीप हंगाम २०२५ पासून या मदत रकमेची अंमलबजावणी केली जाईल. जर सरकारने वेगळी कोणतीही मदत जाहीर केली नाही, तर या आदेशात सांगितल्यानुसारच मदतीचे वाटप केले जाईल.



