परतीचा पाऊस घालनार धुमाकूळ, या तारखेपासून सुरुवात – रामचंद्र साबळे

परतीचा पाऊस घालनार धुमाकूळ, या तारखेपासून सुरुवात – रामचंद्र साबळे

 

प्रसिद्ध हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी गुरुवार, दि. २८ ऑगस्ट ते शनिवार, दि. ३० ऑगस्ट २०२५ या चार दिवसांचा हवामान अंदाज, तसेच परतीच्या पावसाविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

 

परतीचा पाऊस  – रामचंद्र साबळे

 

शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय असलेल्या परतीच्या पावसाविषयी डॉ. साबळे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे. त्यांच्या मते, १ सप्टेंबर २०२५ पासून ईशान्य मान्सून म्हणजेच परतीच्या मान्सूनला सुरुवात होईल. हा पाऊस १५ ऑक्टोबरपर्यंत राज्यात सक्रिय राहील. यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता असून, परतीचा पाऊस १५ ऑक्टोबरनंतरही काही काळ सुरू राहू शकतो, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

 

चार दिवस पावसाचा जोर वाढनार आहे.

 

डॉ. साबळे यांच्या अंदाजानुसार, येत्या चार दिवसांत महाराष्ट्रावर कमी हवेच्या दाबाचा प्रभाव राहणार आहे. राज्याच्या उत्तर भागावर १००४ हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब असेल. या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, विविध भागांत पावसाचा जोर वाढनार आहे.

 

 

हवेचे दाब कमी झाल्यामुळे विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात अतिवृष्टीची शक्यता आहे अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे..

 

 

कोकणातील सर्व जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दररोज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे असा अंदाज साबळे यांनी दिलाय…

 

 

विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया आणि दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका पाऊस पडेल.. डाँ.साबळे

 

Leave a Comment